शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिराळ्यात विधानसभेला चौरंगी लढतीचा डाव- निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:11 IST

इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना

ठळक मुद्देसम्राट महाडिक, अभिजित पाटील रिंगणात थांबण्यासाठी प्रयत्न, नवी समीकरणे

अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना अद्याप उभारी आलेली नाही. आता वाळवा तालुक्यातील सम्राट महाडिक, अभिजित पाटील यांनाही शिराळा मतदारसंघ महत्त्वाचा वाटू लागला आहे. हे दोघेही उभे रहावेत म्हणून एका नेत्याने देव पाण्यात घातले आहेत.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक, मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख विकासाचा डांगोरा पिटत आहेत. या मतदार संघातील डोंगरी भागाचा विकास झाला पाहिजे, मुंबईकडे वळणारा तरुण भागातच राहिला पाहिजे, यासाठी शिराळ्यात औद्योगिक क्षेत्र तयार केले, याचेही श्रेय लाटण्यासाठी नेते सरसावले. उद्योगांच्या नावाखाली नेत्यांच्या बगलबच्चांनीच तेथील भूखंड लाटले. त्यानंतर ते भूखंड चढ्या भावाने विकले, तर काहींनी अनुदान हाणले. त्यामुळे या परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळालेच नाही. हाच मुद्दा घेऊन सम्राट महाडिक यांनी रणशिंग फुंकले आहे.

मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील तरुण सम्राट महाडिक यांच्या मागे असल्याचा दावा महाडिक युवा शक्तीकडून केला जात आहे. मात्र याचा आनंद राष्ट्रवादीतील नेत्यांना होत आहे. महाडिक गटाचा फटका आमदार नाईक गटाला बसेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील शिराळा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. त्यामागेही राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.कुणाची ताकद, कोण कमजोर?शिराळा मतदार संघात समाविष्ट, परंतु वाळवा तालुक्यातील ४९ गावांमध्ये आमदार जयंत पाटील यांची सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. येलूर, पेठ जिल्हा परिषद मतदार संघात महाडिक गट वरचढ आहे, तर आमदार शिवाजीराव नाईक यांचाही ४९ गावात उल्लेखनीय लोकसंपर्क आहे. विविध फंडातून राष्टÑवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी विकासकामे केली आहेत. निष्ठावान काँग्रेसचे मतदार बोटावर मोजण्याएवढेच राहिले आहेत. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची ताकद कमकुवत आहे. 

२००९ च्या निवडणुकीत आम्ही मानसिंगराव नाईक यांना मदत केली. सम्राट महाडिक आणि अभिजित पाटील यांच्या भूमिकेने काहींचा फायदा होईल, असे वाटणे चुकीचे ठरेल. ते दोघे आमचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्यापासून काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र होते. आता त्यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. आघाडी झाल्यास शिराळा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे.- सत्यजित देशमुख, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस.